फॉलोअर

सोमवार, ३ जून, २०२४

 श्रीविठ्ठलमूर्ती लपविणे आणि पहिले शाहु छत्रपतींची सनद !

श. २० वैशाख शुद्ध नवमीस (२३ एप्रिल १६९४) रोजी छत्रपति राजाराम महाराजांनी एक अभयपत्र व एक आज्ञापत्र काढले त्यांवरून असें दिसतें कीं, मुगलांचा ज्या ज्या वेळीं पंढरपुरास त्रास होई तेव्हां तेव्हां विठ्ठलाची मूर्ति पंढरपूरजवळच्या देगांव या गावात लपवून ठेवीत. मराठा मुगल संघर्षात महत्वाच्या ठिकाणी वारंवार उपद्रव उत्पन्न होई त्यामुळे उपद्रव झालाच तर देवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनें म्हणून हीं पत्रें आहेत. या पत्रांच्या अनुरोधानें मराठा सेनापति संताजी घोरपडे यांनी श. १६१७ आपाढ वद्य ९, ( १६९५ जुलै २४) रोजीं उपर्युक्त गावास कोणत्याही प्रकारें उपद्रव न देण्यावद्दल आणि कोणी दिला तर त्याचें पारिपत्य करण्यावद्दल लढाईस सदा तत्पर असलेल्या घोडदळास (पागेस) आज्ञा केली आहे. श. १६१७ आश्विन शुद्ध पंचमी (१६९५ ऑक्टोवर २) ला पंढरपूरच्या सर्व गांवकऱ्यांनी लिहून दिलेलें एक पत्र आहे. त्यावरून असे दिसतें कीं, बडव्यांनीं मुगल परचक्राच्या धामधुमीमुळे एकदां मूर्ति लपवून ठेवण्यासाठीं देगाव येथें नेली असतां देगावकरांनीं देव सर्व पंढरपूरकरांचा आहे तर सर्व पंढरपूर गावानें विनंति केल्याखेरीज आम्ही मूर्ति ठेवून घेत नाहीं असा आक्षेप घेतला. तेव्हां देव वडव्यांचा असें समस्त पंढरपूरकरांनीं लिहून दिल्याचें हें पत्र आहे. यामुळे सर्वांच्या विनंतीवरून मूर्ति देगावांत ठेविली गेली. पुढे धामधूम शांत झाल्यावर वडवे मूर्ति परत पंढरपुरास नेऊं लागले असतां देगावकरांनीं मूर्ति पोंचल्याची पावती मागितली. तेव्हां प्रल्हादवुवा, गोपाळ विठ्ठल इत्यादि सात बडव्यांनीं श. १६२१ कार्तिक शुद्ध प्रतिपदेस (१६९९ ऑक्टोवर १३) रोजी पावती दिली त्यानंतर ते मूर्ति घेऊन गेले. ( संदर्भ - पढरपूर संशोधन मंडळ - वि. गो. वडवे यांजकडील कागद. ; विश्वनाथ गोपाळ बडवे यांचे कागद )
मुगलांच्या मुर्तिभंजनाच्या धाकामुळे अनेक ठिकाणच्या मूर्ति वर्षानुवर्षं लपवल्या गेल्याचेही दाखले आहेत. उदाहरणार्थं श्रीरंगम् येथील मूर्तीचित्रात प्रचलित असलेल्या दोन कथा साउथ इंडिया अँड हुर मुहम्मदन इनव्हेवर्स या पुस्तकांत दिल्या असून एकींत तर श्रीरंगम् च्या मूर्तीने सुमारे ६० वर्षे वनवासांत काढल्यावर तिची पुनः पूर्वीच्या ठिकाणी स्थापना झाली असे सांगितले आहे. (पृ. ११२–११६, १५७-१६४). या वनवासाच्या काळाबाबत अतिशयोक्ति असण्याचा संभव आहे परंतू परचक्राचे वेळीं सुरक्षिततेसाठीं अशा तऱ्हेनें मूर्ति हलविणें शक्य आहे. ५ अ. राज शक ३५ माघ वद्य ५, बुधवार (इ. १७०९ जानेवारी १९) या मितीस पहिले शाहू छत्रपतींनी दिलेल्या एका सनदेची एक नक्कल उपलब्ध आहे. त्यावरून असे दिसतें कीं, श्रीविठ्ठलाचा अभिषेक, पूजा, नैवेद्य व दिपाराधनासाठी गोपाळ विठ्ठल बडवे यांनी श्रीविठ्ठलाची पूजा सांग करावी म्हणून छत्रपति राजाराम महाराजांनी प्रत्येकी १८० पादशाही होनांचें वर्षासन दिलें होतें. त्याविषयी छत्रपती राजाराम महाराजांचे पत्र आणून दाखविल्यामुळे पहिले शाहु छत्रपतींनी सुद्धा प्रस्तुत सनद करून दिली. !! .... अमर दांगट

All reactions:
You, Mahendra Dangat, Nitin Urit and 85 others


#राज्यव्यवहारकोश
' किंवा राजकोष हा ग्रंथ आजवर रघुनाथपंडित (रघुनाथ नारायण हणमंते) यांनी रचलेला आहे असे समजले जात होते आणि त्याची रचना शिवराज्याभिषेकानंतर, इ. स. १६७७-७८ च्या सुमारास शिवाज्ञेने रघुनाथपंडितांनी केली आहे, असे मानले जात होते. परंतु अलीकडे ख्यातनाम संशोधक डॉ. माणिकराव धनपलवार यांनी या ग्रंथाचा कर्ता आणि रचनाकाळ यांचा निर्णय सप्रमाण केला आहे. या ग्रंथाचा कर्ता धुंडिराज लक्ष्मण व्यास हा असून, तो तंजावरचा राजा शहाजी ( इ. स. १६८४-१७१०) यांचा आश्रित होता. त्याने अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची रचना केलेली आहे. रघुनाथपंडित हे शहाजीराजांच्या काळापासून दक्षिणेतील मराठा सत्तेचे मुत्सद्दी म्हणून वावरणारे विद्वान् होते; शिवाजीराजांनी हे कार्य त्यांच्याकडे सोपवले असले, तरी राजकीय कार्याच्या व्यवधानात त्यांना ते शक्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या संबंधातील समर्थ कविपंडिताकडे धुंडिराज व्यासांकडे त्याची जबाबदारी सोपवली. धुंडिराज व्यासाने हे जिकिरीचे कोशरचनाकार्य पुरे केले, परंतु ते शिवकाळात नव्हे, तर तंजावर नृपती शहाजीच्या राज्यकाळात, म्हणजे १६८४ नंतर केव्हा तरी या वेळी शिवछत्रपती आणि रघुनाथपंडित हे दोघेही प्रेरक पुरुष हयात नव्हते. “ इति श्री शिवच्छत्रपतिप्रियामायेन नारायणाध्वरिसूनुना रघु नाथपण्डितेन शिवराजनियोगतः कृते राजव्यवहारकोशे पण्यवर्गो दशमः समाप्तः । शके १६४७ विश्वावसौ फाल्गुन कृष्ण १४ चंद्रे समाप्तम् ।। यावरून हा ग्रंथ इ. स. १७२५ मधे लिहिला आहे हे स्पष्ट आहे. ग्रंथकाराने या दोघांविषयी रघुनाथपंडिताच्या भूमिकेतूनच गौरवापर श्लोक या ग्रंथात लिहिलेले आहेत. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांचा आणि त्यांच्या कुळांचा गौरव गाणाऱ्या या कवीने, खास कुळकीर्तीची पार्श्वभूमी उभी करण्याचा प्रसंग असूनही भोसले कुळाचा संबंध राजस्थानातील सिसोदिया रजपुतांशी असल्याचे चुकूनही सूचित केले नाही, हे आपण गंभीरपणे ध्यानीं घ्यायला हवे. ... क्रमश !! ..... अमर दांगट

All reactions:
You, Atul Dangat, Nitin Urit and 71 others

 

छत्रपती शिवरायांचा शिल्पांकित झालेला सत्य इतिहास

#मराठा आणि मल्लम्मा देसाई संघर्ष, बेलावाडी, कर्नाटक           राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी पूर्व तयारी कारून छत्रपती शिवाजी महाराज ...